Friday, August 21, 2015

Shri NavanathBhaktiSar श्रीनवनाथभक्तिसार महात्म्य


Shri Navanath BhaktiSar 
Shri NavanathBhaktiSar is a very pious and holy Granth. It is in Marathi Language and written By Malu a Poet son of Dhundi from Narahar Family. It has got 40 Adhyayas and consists of 7,500 Stanzas. Many people read it either in seven or nine days mostly in the month of Shravan or all over the year. Such reading with faith, concentration and devotion fulfills their desires and receive happy and peaceful life by the blessings of Navnatha.
श्रीनवनाथभक्तिसार महात्म्य
श्रीनवनाथभक्तिसार हा नरहरी वंशांतील धुंडीसुत मालू कवि यांनी लिहिलेला मराठी भाषेंतील एक अतिशय पवित्र व प्रासादिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्यें नाथ संप्रदाय स्थापना व तो पुढे वाढण्यासाठी नवनाथांनी केलेल्या प्रयत्नांचे, गाजविलेल्या पराक्रमांचे त्यांच्या संक्षिप्त चरित्रासह अत्यंत रसाळ व भावपूर्ण असे विवेचन मालू कवि यांनीं केलेले आहे. भाविक भक्त या ग्रंथाचे पारायण श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने करत असतात. त्यांना त्याच्या आयुष्यांत आधिभौक्तिक व आध्यात्मिक अनुभव येऊन त्यांचे जीवन सुख, समृद्धिने परिपूर्ण होते व या खडतर जीवनांतील अडचणी, संकटें व त्रास दूर होतात.    
ग्रंथाविषयी माहिती 
हा ग्रंथ नरहरी वंशांतील धुंडीसुत मालूकवि यांनी मराठीमध्ये लिहीलेला आहे. शके १७४१ प्रमाथी संवत्सरांत ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस हा लिहून पू्र्ण झाला. या ग्रंथाचे एकंदर चाळीस अध्याय आहेत. ७५०० ओव्या आहेत. नाथभक्त व भाविक साधक वर्षभर या ग्रंथाचे आपापल्या पद्धतीनुसार श्रद्धेने व भक्तिभावाने पारायण करीत असतात.  
पारायण सुरवात
शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर, गुरुवार, शुक्रवार या दिवशी पारायण सुरु करावे. 
अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा, आणि रेवती
ही शुभ नक्षत्रें आहेत. 
पारायणाची पूर्व तयारी
सकाळी लवकर उठावे. सूर्याला नमस्कार करुन 
ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 
या मंत्राचा २७ वेळा भक्तिने जप करावा. स्नान करावें. जमल्यास भस्मलेपन करावे. घरांतील देवांची पूजा करावी. 
गायत्री मंत्राचा २७ वेळा किंवा 
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 
या दत्तमंत्राचा  १०८ वेळा जप करावा.  
पूर्वेकडे अगर पश्र्चिमेकडे तोंड करुनच शक्यतोवर पारायणास बसावे. आपल्या समोर पाट मांडावा त्यावर नवे निळसर वस्त्र घालावे. 
त्यावर नवनाथभक्तिसार ही पोथी ठेवावी.  
आपल्याला बसायलाही पाट किंवा आसन घ्यावे.
पारायणाची तयारी 
फुलें, हार, तुळशी, अक्षता, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपार्‍या, नैवेद्यासाठी पेढे, हीना अत्तर, रांगोळी, पाट, नारळ, दक्षिणा, पळी, ताम्हन, पाण्याने भरलेले तांब्याभांडे आदि.
देंवापुढे, दत्ताच्या नवनाथांसह असलेल्या तसबिरी समोर विड्याची पाने, दक्षिणा व सुपारी, नारळ ठेवावे. सुंदर रांगोळी काढावी. दत्ताच्या नवनाथांसह असलेल्या तसबिरीला हार घालावा. कलशाची स्थापना करावी व फुले, तुळशी यानी पूजा करावी. उदबत्ती, धूपदिप समई लावावी व ही समई पूर्ण पारायण काळांत अखंड तेवत ठेवावी. पोथीस, फोटोस गंध, फूल अक्षता व्हाव्यांत. अत्तर लावावे.
श्री गणपती, कुलदैवत, सद्गुरु व घरांतील वडिलधारी मंडळी यांना नमस्कार करावा. पोथीवर हात ठेवून आपली मनोकामना,संकल्प उच्चारावा. उजव्या हाताच्या तळव्यावर पळीनें पाणी घेऊन पोथीचे पारायण करण्याचे कारण काय व फलप्राप्ती याचा उच्चार करुन ते पाणी ताम्हणांत सोडावे. फलप्राप्ती नवनाथांकडून व्हावी म्हणून नमस्कार करावा. 
पारायण काळांत सोवळेच नेसले पाहिजे असे नाही धूत वस्त्र नेसले तरी चालते. तसेच स्त्रियांनी पारायण केले तरी चालते. 
नंतर पारायणास प्रारंभ करावा.   
पारायणाच्या प्रचलित पद्धती
पारायण सात दिवसांचे अगर नऊ दिवसांचे अशा दोन प्रकारे करतात.
सात दिवसांचे पारायण 
रोजचे वाचन
पहिला दिवस     १   ते    ६      अध्याय
दुसरा दिवस      ७    ते   १२   अध्याय
तिसरा दिवस   १३   ते   १८   अध्याय
चौथा दिवस      १९  ते   २४    अध्याय
पाचवा दिवस    २५  ते   ३०    अध्याय
सहावा दिवस    ३१ ते    ३६    अध्याय 
सातवा दिवस    ३७  ते   ४०    अध्याय
नऊ दिवसांचे पारायण
रोजचे वाचन
पहिला दिवस       १   ते     ६      अध्याय
दुसरा   दिवस       ७   ते    ११    अध्याय
तिसरा  दिवस      १२  ते    १६    अध्याय
चवथा   दिवस       १७  ते    २१    अध्याय 
पाचवा  दिवस       २२  ते    २६    अध्याय
सहावा  दिवस       २७  ते    ३१    अध्याय
सातवा  दिवस       ३२  ते    ३५    अध्याय
आठवा   दिवस       ३६  ते    ३८   अध्याय
नववा    दिवस       ३९  व    ४०   अध्याय
कांही भाविक नाथभक्त साधक या पद्धतीने पारायण न करतां रोज १, ५, १०,१०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. कांही साधक एकच ठराविक अध्याय रोज वाचतात. श्रावण महिन्यांत रोज वाचणारेही बरेच साधक आढळतात.  
रोजच्या पारायणानंतर
रोजच्या पारायणानंतर नैवेद्य दाखवून धूपदीप लावून आरती करावी. श्रीगणेश, श्रीशंकर, श्रीदेवी, श्रीदत्त व श्रीनवनाथांची आरती म्हणावी. मनःपूर्वक नवनाथांची प्रार्थना करावी.
साष्टांग नमस्कार घालावा. प्रसाद घ्यावा व उपस्थित सर्वांना द्यावा.  
नवनाथांची प्रार्थना
१) ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः  २) ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः  ३) ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः  ४) ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः  ५) ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः  ६) ॐ चैतन्य अडबंगनाथाय नमः  ७) ॐ चैतन्य चौरंगीनाथाय नमः  ८)  ॐ चैतन्य रेवणनाथाय नमः  ९) ॐ चैतन्य भर्तरीनाथाय नमः  १०) ॐ चैतन्य गहिनीनाथाय नमः  ११) ॐ चैतन्य नवनाथाय नमः पारायण समाप्ती
महानैवेद्य
तांदूळ व मूग डाळ याची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभर्‍याच्या घुगर्‍या, उडदाचे, भाजणीचे वडे, दही, ताक व जोंधळ्याची खीर (आंबिल) हे पदार्थ करुन देवांना व नवनाथांना नैवेद्य दाखवून नातेवाईक, मित्र मंडळी यांसह महाप्रसाद सेवन करावा.
पारायण सांगतेच्या दिवशी भाजणीचे वडे जेवताना करावे.
पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण, सवाष्ण यांना जेवावयास बोलावून
भोजन, विडा व दक्षिणा द्यावी. सोमवारी शंकरास व गुरुवारी दत्तास अभिषेक करावा.
पारायण काळांतील नियम
१ वाचन आंघोळ झाल्यावरच करावे.
२ भस्मलेपन कपाळावर, दोन्ही दंडांवर, हृदयाला, गुडघ्यांना करावे.
३ वाचन मनांत करु नये. मोठ्याने मध्यम आवाजांत करावे. 
४ वाचन चालू असताना मध्ये कांही बोलू नये. फोन, मोबाईल, टि.व्ही. बंद ठेवावेत. 
५ पूर्ण श्रद्धेने, विश्र्वासाने व एकाग्रतेने वाचन करावे. वाचत असलेला प्रसंग अनुभवावा.
६ पारायण कालांत सात्विक अन्नच सेवन करावे. मांसाहार करु नये. 
शक्यतोवर बाहेरचे कांही खाऊ नये.
७ ब्रह्मचर्य पालन करावे. कोठलेही व्यसन करुं नये. ८ वाचून झालेल्या भागांचे मनन चिंतन करुन नवनाथ सान्निध्य अनुभवावे.  
९ शुद्ध आचरण व त्याचे पालन कायिक, वाचिक व मानसिक हे असणे
आवश्यक असते.
१० पवित्र तीर्थक्षेत्री, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदिक्षेत्री केलेले पारायण शीघ्र व विशेष फलदायी होते. 
फलप्राप्ती 
प्रत्येक अध्यायाची फलश्रुती
अध्याय १ समंधबाधा नाहीशी होते.
अध्याय २  धनप्राप्ती व विजय यांचा लाभ होतो.
अध्याय ३  शत्रूचा नाश, वशीकरण विद्या प्राप्ती व घरांत मारुतीचे वास्तव्य होते.
अध्याय ४ कपटबंधनांतून सुटका व शत्रुचा पराभव.
अध्याय ५ घरांतील कोणालाच भुतबाधा होणार नाही व झालेली असेल तर ती नाहीशी होईल. घरांत भुताचा संचार असेल तर तो नाहीसा होईल.
अध्याय ६ शत्रुच्या मनांतील कपट दूर होऊन तो मित्र होईल.
अध्याय ७ जन्ममरणाचा फेरा चुकेल, मोक्षप्राप्ती, व्यथा, पीडा दूर होऊन चिंतामुक्ती मिळेल.
अध्याय ८ दूर देशीं गेलेला मित्र, नातेवाईक परत येईल व चिंता, व्यथा दूर होतील. 
अध्याय ९ चौदा विद्या व चौसष्ट कलांची प्राप्ती होईल.
अध्याय १० स्त्रीदोष जातील, मन निःकपट होईल, मुले जगतील.
अध्याय ११ अग्निपीडा होणार नाही. गृहदोष नष्ट होतील.
अध्याय १२ देवतांचा राग जाऊन त्यांचे आशिर्वाद मिळतील.
अध्याय १३ स्त्री हत्येचा दोष जाईल व पूर्वजांचा उद्धार होईल. 
अध्याय १४ तुरुंगातून सुटका व निर्दोषत्व.
अध्याय १५ कुटुंबांतील कलह थांबतील व शांती लाभेल. 
अध्याय १६ दुःस्वप्न नाश.
अध्याय १७  योगसिद्धी व सन्मार्ग प्राप्ती.
अध्याय १८  ब्रह्महत्येचा दोष जाईल व कुंभीपाक नरकांतून पितरांचा उद्धार होईल.
अध्याय १९ परमानंदकारक मोक्षप्राप्ती मार्ग मिळेल.
अध्याय २० वाचनकर्तास मानसिक स्वास्थ लाभून उत्तम प्रपंच होईल.
अध्याय २१ गोहत्येचे पाप नष्ट होऊन तपोलोकांत जाता येते.
अध्याय २२ विद्वानांना मान्य असा विद्यासंपन्न पुत्रलाभ होईल.
अध्याय २३ घरांत सोने कायम राहील.
अध्याय २४ बालहत्येचा दोष जाऊन मुलें सुखी होतील. 
अध्याय २५ शाप बाधणार नाही. मनुष्यजन्म मिळेल. सुंदर स्त्री व पुत्र लाभ होईल.
अध्याय २६ गोहत्येचा दोष जाऊन मुले शत्रुत्व करणार नाहीत.
अध्याय २७ हरवलेली वस्तु व गेलेला अधिकार परत मिळेल.
अध्याय २८ सेवाभावी व गुणवान स्त्री मिळेल.
अध्याय २९ क्षयरोग नष्ट होईल व त्रिविध तापांतून सुटका होईल. 
अध्याय ३० चोरी होणार नाही.
अध्याय ३१ शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग वाचणार्‍यावर होणार नाहीत.
अध्याय ३२ गंडातर जाऊन आयुष्य वृद्धी होईल.
अध्याय ३३ धनुर्वात होणार नाही झालेला असल्यास बरा होईल. 
अध्याय ३४ वाचनकर्त्यास कार्यसिद्धि मिळेल व तो यशस्वी होईल.
अध्याय ३५ महासिद्धि लाभ व बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल.
अध्याय ३६ साप व विंचू बाधा होणार नाही व झाली असल्यास बरी होईल.
अध्याय ३७ दुश्चितपणा व दुःशीलता नष्ट होऊन विद्या प्राप्ती होईल.
अध्याय ३८ हिंवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील.
अध्याय ३९ युद्धांत विजय प्राप्त होईल. 
अध्याय ४० परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा अध्याय आहे. संपूर्ण पोथी वाचल्याचे पूण्य प्राप्त होऊन पुत्रपौत्र, धनधान्य, संपत्ती, यश, मानसन्मान, चिंताविरहित, भांडणे, त्रास यापासून मुक्त जीवन श्रद्धेने वाचणार्‍या भाविकास देणारा असा हा अध्याय आहे.
पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने नवनाथांना शरण जाऊन केलेल्या पारायणाने दिव्य अनुभव नक्कीच येतात व इच्छित फलप्राप्ती होते.
तशीच सर्व भाविक, साधक व नवनाथभक्त यांना ती प्राप्त होवो अशी नवनाथ चरणी प्रार्थना करतो.
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय link
Shri NavanathBhaktiSar 
श्रीनवनाथभक्तिसार महात्म्य



Custom Search

8 comments:

Karan Jadhav said...

जय सदगुरू
खूप खूप धन्यवाद 🙏🏼

Unknown said...

नऊ दिवसांचे पारायण करायचा मनोदय आहे. रोजच्या वाचनाला साधारण किती वेळ लागतो? कृपा करून कळवावे.

ganeshchavan said...

2 tas

Unknown said...

स्त्रियांनी वाचावे का नाही?

Prakash Ketkar said...

नमस्कार स्त्रीयांनी वाचन करावयास हरकत नाही असे माे.झे मत आहे.

Unknown said...

फक्त ४०वा अध्याय किती दिवस वाचन करावे?

Ameet said...

सर्वसाधारण एक अध्याय शांतपणे, लक्षपूर्वक वाचायला 30-35 मिनिटे लागतात.

Yogesh Solunke said...

श्रावण महिन्यात 40 दिवसांचे नियोजन सांगा
समाप्ती कोणत्या दिवशी करावी.?